Posts

Showing posts from July, 2019

शिव और राम - उपास्य या मिथ्या? क्या कहते हैं हमारे विद्यालय?

शिव और राम - उपास्य या मिथ्या ? क्या कहते हैं हमारे विद्यालय ? - लीना मेहेंदळे भारतीय वाङ्मयमें एक गलत शब्द घुस गया है -- मायथोलॉजी या मिथक । यह अब हमारे विद्यापीठोंमें भी धडल्लेसे सुप्रतिष्ठित हो रहा है । भारतकी कई युनिवर्सिटियोंमें मायथोलॉजीके क्रॅश कोर्समें रुद्रको मिथिकल चरित्रके रूपमें पढाया जाने लगा है। यह हमारी उपासना - आधारित संस्कृतिको गहरी चुनौती है। क्या भारत झेल पायेगा ये चुनौती ? आज उसीका परामर्श लेना है। विश्वभरकी सारी सभ्यताओंका ब्यौरा लें तो हम पाते हैं कि निर्गुणकी उपासना और सगुणसे प्रीत ये दो बातें सारी सभ्यताओंमें थीं। इस सगुण - प्रीतमें थोडासा श्रद्धाभाव भी आ जाता है , भययुक्त आदर भी आता है और कल्पनाविलास भी बडी मात्रामें आ जाता है। सगुण - प्रतीकोंमें सूर्य , वर्षा , मेघ , बिजली , चंद्रमा , सागर , नाग ये अतिचर्चित प्रतीक रहे। सगुण प्रतीकोंकी विशेषता ये होती है कि वे होते तो हैं कोई प्राकृतिक वस्तुमान लेकिन कल्पनामें उन्हें मानवी रूप दिया जाता है। उनमें श्रद्धालु हों तो वे प्रतीकोंसे मनौतियाँ भी माँग लेते हैं और उनके दैवी गुणोंसे ल

*क्विक हील.* अँटी व्हायरस ची कथा

दहावी नंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं दोन हजार कोटींची आयटी कंपनी उभी केली* Story of Quick Heal Antivirus's Birth नाव कैलास काटकर. गाव मूळच सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूर. राहायला पुण्याच्या शिवाजीनगर मधल्या नरवीर तानाजीवाडी मध्ये. वडील फिलिप्स कंपनीमध्ये हेल्पर, आई घरकाम करणारी. एक लहान भाऊ आणि एक बहिण. असं हे पाच जणांचं कुटुंब नतावाडीतल्या एका छोट्याशा खोलीत राहायचं. कैलाश सगळ्यात थोरला. त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा त्याच्याकडूनच. घरची परिस्थिती कशीही असली तरी त्याला इंग्लिश मिडीयम शाळेत घातलेलं.  पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत, फी भरायला पैसे नाहीत. कसबस रडत खडत दहावी पर्यंत पोहचला. पण दहावीनंतर पुस्तकी शिक्षणाला रामराम ठोकला आणि खऱ्या शिक्षणाला सुरवात केली. आयुष्य शिकवत असलेलं व्यावहारिक शिक्षण. तसं कैलासला लहानपणापासूनच घरातल्या बिघडलेल्या वस्तू सोबत खटपट करायची आवड होती. वडिलांचं बघून बघून सहावीमध्ये असतानाच रेडियो दुरुस्त करायला सुरवात केली होती. त्याबद्दलचा एक महिन्याचा कोर्ससुद्धा केला होता.काही तरी करू असा आत्मविश्वास होता. दहावीच्या निकालाची वाट न बघता नोकरी शोधायला सुरवात केल

CHINA TO APPOINT NEXT THE DALAI LAMA ?

WHO IS CHINA TO APPOINT NEXT THE DALAI LAMA ? Taking the world view for granted and with least regard for the views of the Buddhists across the world and with characteristic audacious  and arrogant approach, Government  of China has now said that the next the Dalai Lama must be approved by the Chinese government and selection should take place  only from China. Chinese government today is a totalitarian regime and recognizes no religion. The places of worship in China are strictly supervised by the Chinese government and regulations have been imposed on them. China has persecuted Muslims who have preferred independent religious approach as per the dictates of their religion. Christians too live under fear in China to practice their religious methods. Unfortunately, the world is keeping it’s eyes deliberately closed to China’s religious onslaught and aggressive approach in curbing the freedom of religions. Several decades back, China forcefully occupied Tibet killing several

वाचन संस्कृती कशी वाढेल.

21/4/2019 आपटे वाचनालय इचलकरंजीसाठी वाचन संस्कृती कशी वाढेल. " मी पुस्तके चाऊन चाऊन वाचतो, ”   खूप वर्षांपूर्वी एका नुकत्याच ओळख झालेल्या व्यक्तिने मला हे वाक्य सांगितले होते. आमची ओळखही त्यांच्या लेखनप्रतिभेमुळे, विशेषतः लेखनातील सुस्पष्ट विचारांमुळे झाली होती. ते कुणी मोठे लेखक वगैरे नव्हते – आताही नाहीत, पण विचारांची सुस्पष्टता आजही जाणवते. म्हणूनच की काय, एखादे नवे पुस्तक वाचायला घेतले की वरील वाक्य हमखास आठवते. असाच दुसरा प्रसंग – एक सरपंच – लौकिकदृष्ट्या शालेय शिक्षणही पूर्ण न केलेले, पण विकासाची प्रगल्भ दृष्टि असलेले. त्यांच्या घरी चहाला गेलेली असताना हॉलमधील लांबच्या कोपऱ्यात बसून एक तरूण अत्यंत मंद आवाजातील रेडियो ऐकत होता. मी आवाज मोठा करायला सांगितल्यावर सरपंच म्हणाले – चला आपण तिथे जाऊन रेडियो ऐकू. माझ्या चेहऱ्यावरील प्रश्नवाचक चिन्ह पाहून पुढे म्हणाले – रेडियो ऐकायचा असेल तर बारीक आवाज ठेऊन व पूर्ण लक्ष देऊन रेडियो ऐका अशी शिस्त मी घरात लावलेली आहे. रेडियोचा बदाबदा आवाज आपल्या कानांवर कोसळतोय आणि आपण दुसरेच कांही तरी करतोय असे होऊ देऊ नये. पूर्ण लक्ष

उद्धवगीता भाग- २

उद्धवगीता भाग - २ – लीना मेहेंदळे उद्धव गीतेवरील पहिल्या लेखात आपण पाहिले की श्रीकृष्णाने उद्धवाला समदृष्टिची शिकवण दिली . सर्वांमधे माझाच आत्मा वसत आहे , ही आनंददायी दृष्टि ज्याला मिळाली तो समदृष्टि . असा मनुष्य रागद्वेष , सुख दुःख तसेच देहाच्या व्यापारात सत्व - रज - तम या त्रिगुणांच्या द्वारे उत्पन्न होणाऱ्या कर्मफलांच्या इच्छेपासून मुक्त रहातो . ज्ञान आणि विज्ञानामधील फरक उद्धवगीतेत स्पष्ट केलेला आहे . शास्त्रग्रंथांद्वारे जाणून घेता येते ते ज्ञान पण अनुभूतिशिवाय त्याला विशेषत्व येत नाही . अनुभूतितून मिळवलेले ते विज्ञान . यामुळेच मनुष्याची व्याख्या ब्रह्मावलोकधिषणः पुरूषः अशी करत श्रीकृष्ण सांगतो की माझ्याच रचलेल्या संपूर्ण सृष्टिपैकी मानव जन्मधारी मला सर्वात प्रिय आहेत कारण तीक्ष्णबुद्धि व योगाच्या सहाय्याने एकाग्रचित्त होणारा मनुष्यच बुद्धिच्या पलीकडील परमात्म्याला जाणून घेऊन परमपदाला प्राप्त करू शकतो . याचे उत्तम उदाहरण म्हणजे अवधूत दत्तात्रेय . असे सांगत श्रीकृष्णाने उद्धवाला अवधूत आख्यान सांगितले परंतु ते एरवीही प्रसिद्ध असल्याने या लेखांत मी मांडलेले