Posts

Showing posts from June, 2019

शिक्षणबदलात समाजाची मते आधीच घ्या

Image
मटाच्या  28 JUN 2019 मधे लेख शिक्षणबदलात समाजाची मते आधीच घ्या --- लीना मेहेंदळे २४ जून २०१९ बालभारती दुसरीचे नवे गणित या विषयावर इतकी प्रतिक्रिया उमटली की विधानसभेत त्यावर तज्ज्ञ समितीकडून चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्र्यांना सांगावे लागले . मुळात शिक्षण पुस्तकात बदल केला की पेनच्या एका फटकाऱ्यामुळे लक्षावधि मुलांवर , तसेच शिक्षक , व पालकांवर त्याचा परिणाम होणार असतो . म्हणून तो करताना मोठ्या प्रमाणावर समाजमंथनाची गरज असते . तसे न करताच बालभारतीने हा बदल केल्यामुळे आता हा बदल कसा बदलच नाहीये हे सांगावे लागत आहे . आधी समाजमंथन केल्याने हा प्रसंग टळला असता . बदल का केला याची मुख्यत्वे तीन कारणे सांगितली -- ती का असमर्थनीय वाटतात ते पाहूया . पहिला विचार होता जोडाक्षरांचा -- म्हणे मुलांना जोडाक्षरविरहित शिकवण्यासाठी हा बदल आहे . तर मग इतर विषयांनाही तसे केले का ? की गणिताचा एकांगीच विचार केला ? एकीकडे अमेरिकेसारखे देश संशोधन करून आदेश काढतात की मुलांना संस्कृत शिकवा -- त्याने उच्च ा रण , स्मरणशक्ति , इ . इ . बरेच काही वाढते . आणि आपण जोडाक्षरांचा

उद्धव गीता भाग १ -- भांडारकर व्याख्यान दि. १२ जून २०१९

उद्धव गीता भाग १ भागवत पुराणाच्या अकराव्या स्कंधात सात ते एकोणतीसवा अध्याय यात श्रीकृष्णाने उद्धवाला जो दीर्घ उपदेश दिला त्याचे वर्णन आहे . हाच उद्धव गीता या नांवाने ओळखला जातो . त्यापैकी ७ ते ९ अध्याय अवधूत आख्यान आहे , जे स्वतःच्या वेगळेपणामुळे एरवीही छोट्या आख्यानाच्या रूपाने प्रसिद्ध आहे . ऋषींकडून यदुवंशाला नष्ट होण्याचा शाप मिळाला . पण त्याचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न बलराम अथवा श्रीकृष्ण यांनी केला नाही . त्या ऐवजी बलरामाने लगेच वनात जाऊन आपले अवतारकार्य संपवले . श्रीकृष्णही तसेच कांही करणार या विरह - जाणीवेने उद्धव व्याकुळ झाला . तू तरी आम्हास सोडून जाऊ नकोस असे म्हणू लागला . पण श्रीकृष्णाने त्याला बजावून सांगितले की आता तू च स्वजन बांधवांचा मोह सोड , द्वारका सोड , आणि संपूर्ण चित्त माझ्या ठायी ठेऊन समदृष्टिने पृथ्वीवर विचरण कर . समदृष्टी – म्हणजे प्रत्येक प्राण्यांत , किंबहुना चराचराच्या प्रत्येक कणांत मीच दिसेन अशी तुझी दृष्टि होऊ दे . मग उद्धवाला पुढील काळासाठी जणू शिदोरीच , असा उपदेश श्रीकृष्णाने केला . महाभारत युद्धानंतर एकदा अर्ज ु नाने पुन्हा मला