Posts

Showing posts from January, 2008

जुहू शेम नंतर - आता तरी

जुहू शेम नंतर - आता तरी लीना मेहेंदळे 15/1/2008 (जुहू शेम'नंतर तरी कायदे सुधारा! म. टा. 21 Jan 2008) नव वर्षाच्या पहिल्याच रात्री जुहू मधील मरियट होटेल समोर दोन महिलांबरोबर दुर्व्यवहार घडला. त्यानंतर अशा घटनांची जणू मालिकाच चालू आहे. त्यामुळे स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारांच्या प्रश्नावर आपली सामाजिक, प्रशासनिक आणि न्यायिक बाजू किती तोकडी, किती अपुरी आहे हेच पुन्हा एकदा समोर आले आहे. आता तरी याबाबतचे कायदे आपण सुधारले पाहिजेत. त्याचप्रमाणे निव्वळ कायदे सुधारुन किंवा कडक करुन पुरेसे नसते हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्याला फक्त पुस्तकांतील कडक कायदे उपयोगाचे नाहीत. त्यासोबत एक जलदगतीची न्याय प्रक्रिया, तत्परतेने गुन्हयांचा छढा लावू शकणारी पोलीस यंत्रणा, कायद्यांत दुरुस्तीची दिशा दाखवू शकणारे कायदे पंडित, कोर्टात पीडित स्त्रियांच्या प्रश्नांवर पीआयएल करु शकणारे वकील आणि विचार करणारा संवेदनशील समाज हे सर्वच घटक आज तातडीने उपलब्ध होण्याची गरज आहे. जुहूच्या घटनेकडे फक्त विनयभंगाचे प्रकरण म्हणून पहावे की बलात्कारासाठी संगनमत (कान्स्पिरसी) व बलात्काराचा प्रयत्न म्हणून पहावे ? घटनास्थ

कौशल्य शिक्षणाशिवाय पर्याय नाही

कौशल्य शिक्षणाशिवाय पर्याय नाही - लीना मेहेंदळे एक दिवस सहजच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने प्रसिध्द केलेली निवडक शैक्षणिक सांख्यिकी 2002 - 03 वाचत बसले होते आणि खूप वर्षे मनांत खजबजत असणारा कौशल्य शिक्षणाच्या अभावाचा विचार पुन: मनांत दाटून आला. जनगणनेतील आकडेवारी सांगते की महाराष्ट्रात 20 वर्षापर्यंत वय असणारी लोकसंख्या सुमारे 4 कोटी आहे. म्हणजे ढोबळ मानाने प्रत्येक वर्षाच्या वयांतील मुला-मुलींची संस्था सुमारे वीस लाख. त्या तुलनेत शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या किती ? तर आठवीत अठरा लाख, नववीत सोळा लाख, दहावीत बारा लाख. यापुढे अकरावीत आहे आठ लाख तर बारावीत साडे सात लाख. म्हणजे अकरावी - बारावीचा विचार केला (वय वर्षे सोळा, सतरा) तर सोळा लाख विद्यार्थी शाळेत व तेवढेच (किंवा त्याहून जास्त) शाळेबाहेर. उच्च माध्यमिक शिक्षणाचा विचार केला तरी आठवी, नववी व दहावी मिळून 46 लाख मुले शाळेत व 14 लाख शाळेबाहेर. पण पहिली ते सातवीचा विचार केला तर मुला-मुलींची संख्या 140 लाख असतांना शाळेत मात्र 150 लाख विद्यार्थी पटावर आहेत असे आकडे दाखवतात. यावरून नापास होऊन पुन: