Posts

तीन उत्साही पाऊले

गेल्या दोनतीन वर्षांत ज्या ब-याच घडामोडी झाल्या त्याच्यापैकी तीन घटनांची नोंद मी अशी घेतली की होय,या घटनेने संपूर्ण भारतीय जनमानस ढवळून निघाले आहे आणी भारतीय एकात्मतेची वाढ देखील यांच्या मधून होऊ शकते. पुढे वाचा -----------------------------------------

जाणावे मनाचे व्यापार

जाणावे मनाचे व्यापार लीना मेहेंदळे, भा.प्र.से. काही वर्षापूर्वी भारतीय मानसशास्त्र या विषयावरील एका सेमिनारला मी उपस्थित होते. त्या निमित्ताने “मन” या संकल्पनेबाबत बरेच विचार मनांत येऊन गेले. मन हा भारतीय भाषांमधला खास असा शब्द आहे. मन या शब्दाला इंग्रजीत पर्यायी शब्द नाही. साइक (psyche) हा शब्द खर्‍या अर्थाने मन ही संकल्पना उकलून दाखवू शकत नाही. आपला अति प्राचीन ग्रंथ म्हणजे ऋग्वेद. त्यांत मन हा शब्द आलेला आहे. “सं वो मनांसि जानताम्‌” -- “एकत्र बसून एकमेकांचे मन तुम्हीं जाणावे” तसाच पुरुष सूक्तातही उल्लेख आहे “चंद्रमा मनसो जातः ” -- दिव्य पुरुषाच्या मनापासून चंद्राचा जन्म झाला. पुढे पातत्र्जल योगसूत्रांत आणि भगवद्बगीतेतही मनाबद्दल बरच काही लिहिल गेल आहे. याचाच अर्थ असा की ऋग्वेद गायला जाण्यापूर्वीच मन या संकल्पनेवर विचार झालेला होता व मनाचे अस्तित्व मान्य झालेले होते. तेच पुढे ऋगवेदात उतरले. मन आणि वाणी यांचा अन्योन्य संबंध आहे. वाणीचे चार भाग सांगितले आहेत. परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी. यापैकी परा आणि पश्यन्ति या मनाच्या लेव्हलवर आहेत. एखादा विचार बीजरुपा...

युगान्तर के पर्व में

युगान्तर के पर्व में - लीना मेहेंदळे हम कहते सुनते हैं कि हिंदु धर्म मे चार वेद कहे गये हैं - ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद और अथर्व वेद | चार वर्ण भी कहे गये हैं - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य और शूद्र | चार आश्रम हैं - ब्रह्मचर्य गार्हस्थ, वानप्रस्थ और संन्यास | इसी प्रकार चार युग भी कहे गये हैं - सत्य युग, त्रेता युग, द्बापर युग और कलि युग | मेरी मान्यता हैं ये सभी संकल्पनाएँ एक दूसरे में गुंथी हुई हैं | देखा जा सकता हैं कि सत्य युग में समाज की परिकल्पना तो उदित हो चुकी थी लेकिन राजा और राज्य की परिकल्पना अभी दूर थी | आग का आविष्कार हो चुका था, उसी प्रकार भाषा का भी | आँकडों के गणित का भी ज्ञान था और वर्णमाला तथा लेखन कला का भी | मनुष्य अपने आविष्कारों से नए नए आयाम छू रहा था | कृषि और पशुपालन दैनंदिन व्यवहार बन चुके थे और कृषि संस्कृति का विस्तार भी हो रहा था | ज्ञान और विज्ञान की साधना हो रही थी | मनुष्य यद्यपि समाज में रहने लगा था फिर भी गाँव समाज और खेती पर ही पूरी तरह निर्भर नही था | अभी भी वन - जंगल उसे प्रिय थे और वनचर बन कर रहना उसे आता था | ज्ञान साधना क...

Geeta Recitals by Dr. Balram S. Agnihotri -- गीता पाठ

भगवद्गीता पाठ आपण येथे पाहू व ऐकु शकाल. Intro -- SrimadBhagavGeeta and Durga Saptashati are called PATH GRANTH which means that they are to be recited as a daily rite. Thousands of Indian households have this tradition. My father Dr. Balram Sadashiv Agnihotri, Prof of Sanskrit and Philosophy guided research students for M. Phil and Ph. D. at Mithila Research Institute, Darbhanga, Bihar. He was a great student of Geeta and made it an every-evening habit for us children to sit with him for Geeta recital. That is how we all learnt Geeta by heart. Much later, when he was 86, I was able to get complete recording of Bhagvadgeeta done by him. Even at that age he was able to record all the 18 chapters in 1 sitting. Around same time he managed to finish writing his book BuddhiYog, which he was planning for years. It is said in Geeta – “ ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते -- I give good wisdom to people with which they can reach me” To whom does He give the Wisdom and how do we go about g...

yet to adjust

kept on nity leela for adjustment Y_Bhakti_Vithal_Mangal.doc Y_Hushar_Ganiti_Mangal.doc Y_Man_Janave.doc and Mangal Y_Samajkaran_Ghasarla.doc pdf and mangal Y_badalti_jivanshaili.pdf Y_Yugantar_Ke_Parwa.doc and mangal

बदलती जीवनशैली व कुटुंबपध्दती

बदलती जीवनशैली व कुटुंबपध्दती --- लीना मेहेंदळे ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवनाची व समाजाची जीवनशैली बदलते हे सत्य आपल्या जाणीवेत असते. पण मुख्य मुद्दा असतो तो हा की ज्या वेगाने हे बदल होतात ते आपल्याला झेपतात कां ? समाजाची उलथापालथ होऊन जाते की समाज अशा बदलांना पचवू शकतो ? विज्ञान तंत्रज्ञानाचे एक वेगवान वळण म्हणजे 1765 साली जेम्स वॉटने स्टीम इंजिनचा शोध लावणे. यामुळे दळणवळण क्षेत्र वेगवान झाले. या आधीची माल वाहतूक व दळणवळण घोडयांमार्फत होत असे. जोडीला खेचर, गाढव, बैल, उंट असेही प्राणी असत. पण स्टीम इंजिनमुळे सर्वप्रथम प्राणी विरहीत - यांत्रिक दळणवळणाला सुरुवात झाली. दुस-या टप्प्यांत स्टीम इंजिनमुळे उद्योग क्रान्ति - इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आले. त्या आधीची यंत्रसामुग्री हाताने तयार व्हायची प्रत्येक कारागिराच्या कसबाप्रमाणे व स्पीडप्रमाणे त्याला वेळ लागत असे. पण यंत्रनिर्मितीचे यांत्रिकीकरण झाले आणि यंत्र निर्मितीचा वेग झपाटयाने वाढला -- त्याचबरोबर पक्क्या मालाचा तयार होण्याचा वेगही वाढला. त्याला मोठ्या प्माणांत मजूरांची आणी बाजारपेठेचीही गरज भास...

ऊर्जा बचत -- जळगांव विद्यापीठांत व्याख्यानमाला

Image
दै. सकाळ javascript:void(0) Publish Post

आईच्या आठवणी--- बीज चांगुलपणाचे

बीज चांगुलपणाचे 1949 सालची घटना. माझ नुकतंच लग्न झाल होतं. मी त्या दिवशी लोणावळ्याला जाणार होते. तो पर्यंत मी रेल्वेत बसलेली नव्हतेच. माझं माहेर रत्नागिरी जिल्हयातील देवरुख या गावचे. तिथेच मी मॅट्रिक झाले व गांवदेवी मुंबई येथे होस्टेलला आले. इथे एका वर्षातच प्राथमिक शिक्षणाचे ट्रेनिंग पुरे होत असे. ते करतांनाच लग्न ठरले व झाले सुद्धा. लग्नानंतर थोड्याच दिवसांनी परीक्षा होती तोपर्यंत होस्टेललाच राहिले. परीक्षा झाली व हयांनी लोणावळ्याची तिकीटे काढली. आम्ही स्टेशनवर आलो. तो काय गाडी स्टेशनमध्ये थांबलेली व पिवळा सिग्नल पण झालेला. हे भर्रकन गार्डच्या डब्यात गेले व त्याला म्हणाले माझी बायको व हमाल जिना उतरत आहेत तोपर्यंत थांबता का? ती आतापर्यंत कधीच गाडीत बसलेली नाही. पहिल्यांदा झेंडा दाखवा तर ड्रायव्हर थांबेल. नाही तर मी उतरतो खाली. आमचे नशीब बलवत्तर म्हणून गार्डने लाल निशाण दाखविले. गाडी थांबून राहिली. मी पटकन जिना उतरले व हमाल पण. हयांनी हमाली काढूनच ठेवली होती. आम्ही गाडीत बसलो व गाडी सुरु झाली. आज इतकी वर्षे झाली तरी सुध्दा त्या गार्डचे मी आभार मानते. पूर्वी चांगली माणसे ख...

knowledge of HINDI world over

LIST OF PEOPLE OF THE WORLD WHO KNOW HINDI BASED ON 1999 CENSUS No. of Persons know Hindi SrNo Country Population %age Total Nos 1 Arjantina............36600000.........1..........366000 2 Behrein.....................606000.........3..... 18180 3 Bangla Desh.........126900000........30 38070000 4 Bhutan................2100000........30 630000 5 Brajil..............168000000.........1 1680000 6 Myanmar..............45100000.........5 2255000 7 Colambia.............41600000.........1 416000 8 Kostarika.............3900000.........0.4 16600 9 Ecader...............12400000........25 3100000 10 Al-Salvdor...........6200000........10 620000 11 Fizi..................806000........50 403000 12 Gwatemala...........11100000........50 5550000 13 Gayana................855000........50 427500 14 Honduraas............6300000.........8 50400 15 Indonesia...........

सर्व ओझी निवारणासाठी - क्रिकेट

सर्व ओझी निवारणासाठी - क्रिकेट - लीना मेहेंदळे वाचकहो, सर्वत्र असते तसेच याही लेखातील सर्व घटना, स्थानांची व व्यक्तींची नांवे संपूर्णपणे काल्पनिक असून त्यात कोणताही तथ्यांश नाही. जर कोणत्याही व्यक्ती किंवा स्थानाचे नांव किंवा घटनेचा तपशील एखाद्या सत्य घटनेबरोबर मिळता-जुळता असेल तर तो निव्वळ योगायोग मानावा. तर रसिक वाचकहो, आटपाट नगर होते- तिचे नांव मुंबई. तिथे एक मोठी वास्तू होती - जिचे नांव माहीत नाही. परंतु तिथे नित्यनेमाने नाट्यस्पर्धा होत असत. त्या यशस्वी होण्यासाठी एक मुख्य सूत्रधार व त्यांचेबरोबर इतर छप्पन सूत्रधार होते. नाट्यस्पर्धा पहाण्यासाठी लोकांची झुंबड उडत असे. वास्तूच्या दारावर हीss गर्दी असायची. परत जाणारी मंडळी फारशी खूष असावीत असे मला वाटत नाही. कारण बहुतेक प्रेक्षक नाक मुरडीत, नावे ठेवीत जात- इथे येणार्‍याच्या पदरांत कांहीच पडत नाही. हे कसले नाटक - या कसल्या स्पर्धा ? कोण, कोणाशी काय संवाद बोलतो तेच कळत नाही. पडदे कधीही कुठल्याही प्रसंगी पडतात. शिवाय प्रत्येक पात्राच्या शिरावर एक ओझ असते. त्यामुळे त्यांचे चेहरे सदा ओढग्रस्त दिसतात. एक पात्र विंगेत जाऊन परत आल...

इनस्क्रिप्ट मराठी धपाधप लेखन हेतू this article n site

मराठी लेखनाच्या ब्लॉगसाठी - इनस्क्रिप्ट [[ खालील लेखाइतकेच हे 2 व्हिडियो पण सवडीने पाहिल्यास उपयोगी आहेत. Inscript-part- 1-- मराठी हिन्दी धपाधप लेखन हेतू Inscript-part- 2-- मराठी हिन्दी धपाधप लेखन हेतू तसेच ही लिंक देखील पहावी. Link - लीना मेहेंदळे, भा.प्र.से. ]] सुमारे नव्वद ते नव्व्याण्णव टक्के मराठी किंवा कोणत्याच भारतीय भाषेतील लेखकांना हे माहीत नाही कि एका युक्ती मुळे मराठी व तत्सम भारतीय भाषांचे टायपिंग शिकायला फक्त अर्धा तास पुरतो. आणि आता ऑफिसेस मध्ये सर्वत्र संगणकांचा बोलबाला झाल्यावर खूप अधिका-यांनी गरजपुरते एका बोटाने करण्याइतपत इंग्रजी टायपिंग शिकून घेतले आहे. पण त्यांना देखील हे माहीत नाही की त्याच संगणकामध्ये अर्ध्या तासांत मराठी टायपिंग शिकण्याची युक्ती देखील आहे. या युक्तीचे नांव इनस्क्रिप्ट की बोर्ड ले आऊट. शासकीय कार्यालयांत तर हा अनुभव पदोपदी येतो. बारा पंधरा वर्षांपूर्वी कधीतरी शासनाने क्लार्क व टायपिस्ट असे दोन पदांमधले अंतर काढून टाकले. सर्वांचे नामकरण क्लार्क कम टायपिस्ट असे केले. ज्यांना टायपिंग येत नसेल ते शिकून घ्यावे असा फतवा काढला. झालेच तर जे शि...

खिंडीच्या पलीकडे --Khindichya Palikade -A novel

Image
तू सांगितलेला प्रवास शेवटच्या खिंडीपर्यंत घेऊन जातो. किती विचित्र आहे हा प्रवास. एखाद्याने तो पटपट संपवू म्हटला तर संपत नाही, खोडकर ढग नकोत म्हटलं तर ढगांची दरी संपत नाही, आणि खेळकर ढगांसोबत खेळायचय म्हटलं की प्रवास संपून जातो. पण तू मला पुढची गोष्ट सांग ना। हे पंच लोकांना काहीही सांगतात. मी प्रवासाला जाईन ना तेंव्हा लोकांना सांगेन त्यांचं ऐकू नका, माझं ऐका...... म्हणजे तू पण त्यांच्यासारखाच होणार तर?..... नाही, नाही, तसं नाही, पण मग पंचाची चलाखी कशी संपवायची?...... एकच उपाय आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. सगळे मला सांगतात कुणी तरी हो.... पण कुणीही नाही झालं तर?.... कुणीही न होणं म्हणजे उन्मुक्त स्वर, पक्ष्यांचं मंजुळ गाणं, सुगंधाचा स्त्रोत.... आणि शेवटच्या खिंडीपलीकडे कांय आहे? कारण प्रवास तर तिथेही थांबत नाही. सांग ना। khindichya palikade -- A novel Here is the book Translated from Ravindra Nath Prasher's English Novel THE LAST PASS Published in Lokmat, Nashik, Diwali 2002?

जुहू शेम नंतर - आता तरी

जुहू शेम नंतर - आता तरी लीना मेहेंदळे 15/1/2008 (जुहू शेम'नंतर तरी कायदे सुधारा! म. टा. 21 Jan 2008) नव वर्षाच्या पहिल्याच रात्री जुहू मधील मरियट होटेल समोर दोन महिलांबरोबर दुर्व्यवहार घडला. त्यानंतर अशा घटनांची जणू मालिकाच चालू आहे. त्यामुळे स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारांच्या प्रश्नावर आपली सामाजिक, प्रशासनिक आणि न्यायिक बाजू किती तोकडी, किती अपुरी आहे हेच पुन्हा एकदा समोर आले आहे. आता तरी याबाबतचे कायदे आपण सुधारले पाहिजेत. त्याचप्रमाणे निव्वळ कायदे सुधारुन किंवा कडक करुन पुरेसे नसते हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्याला फक्त पुस्तकांतील कडक कायदे उपयोगाचे नाहीत. त्यासोबत एक जलदगतीची न्याय प्रक्रिया, तत्परतेने गुन्हयांचा छढा लावू शकणारी पोलीस यंत्रणा, कायद्यांत दुरुस्तीची दिशा दाखवू शकणारे कायदे पंडित, कोर्टात पीडित स्त्रियांच्या प्रश्नांवर पीआयएल करु शकणारे वकील आणि विचार करणारा संवेदनशील समाज हे सर्वच घटक आज तातडीने उपलब्ध होण्याची गरज आहे. जुहूच्या घटनेकडे फक्त विनयभंगाचे प्रकरण म्हणून पहावे की बलात्कारासाठी संगनमत (कान्स्पिरसी) व बलात्काराचा प्रयत्न म्हणून पहावे ? घटनास्थ...

कौशल्य शिक्षणाशिवाय पर्याय नाही

कौशल्य शिक्षणाशिवाय पर्याय नाही - लीना मेहेंदळे एक दिवस सहजच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने प्रसिध्द केलेली निवडक शैक्षणिक सांख्यिकी 2002 - 03 वाचत बसले होते आणि खूप वर्षे मनांत खजबजत असणारा कौशल्य शिक्षणाच्या अभावाचा विचार पुन: मनांत दाटून आला. जनगणनेतील आकडेवारी सांगते की महाराष्ट्रात 20 वर्षापर्यंत वय असणारी लोकसंख्या सुमारे 4 कोटी आहे. म्हणजे ढोबळ मानाने प्रत्येक वर्षाच्या वयांतील मुला-मुलींची संस्था सुमारे वीस लाख. त्या तुलनेत शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या किती ? तर आठवीत अठरा लाख, नववीत सोळा लाख, दहावीत बारा लाख. यापुढे अकरावीत आहे आठ लाख तर बारावीत साडे सात लाख. म्हणजे अकरावी - बारावीचा विचार केला (वय वर्षे सोळा, सतरा) तर सोळा लाख विद्यार्थी शाळेत व तेवढेच (किंवा त्याहून जास्त) शाळेबाहेर. उच्च माध्यमिक शिक्षणाचा विचार केला तरी आठवी, नववी व दहावी मिळून 46 लाख मुले शाळेत व 14 लाख शाळेबाहेर. पण पहिली ते सातवीचा विचार केला तर मुला-मुलींची संख्या 140 लाख असतांना शाळेत मात्र 150 लाख विद्यार्थी पटावर आहेत असे आकडे दाखवतात. यावरून नापास होऊन पुन:...

ना परतीची वाट

ना परतीची वाट Also kept on http://www.geocities.com/nity_leela/Na_partichi_Vaat2_TBIL_Mangal.doc पंचतंत्रात एक खूप छान कथा सांगितली आहे. एक म्हातारा सिंह शिकार जमेना म्हणून तळयाच्या काठाशी राहू लागला. पणी प्यायला छोटे जनावर आले की तो त्याला मारुन खाऊ शकत असे. एकदा एक कोल्हा त्या जागी आला. दुरुनच निरसून पाहिले तो त्याला कळले की इथे प्राण्यांची जी पावले उमटली आहेत ती फक्त तळयाकडे जाणारी आहेत, तिकडून परत येणारी पावल दिसतच नाहीत. ही ना परतीची वाट आपल्याला नको, अस म्हणून कोल्हा तिथून दुसरीकडे निघून गेला, असे त्याचे प्राण वाचले. तुम्हाला ना परतीच्या वाटेची पुष्कळ उदाहरण माहीत असतील. मोजू या तर. खूपसे रस्ते वन-वे असतात. कित्येक इमारतींना इन-गेट वेगळे आणि आऊट-गेट वेगळे असते. ही झाली दोन उदाहरणे. सर्व व्हॉल्वस्‌ हे याच उपयोगासाठी असतात - की द्रव पदार्थांचा प्रवाह फक्त एकाच दिशेने होऊ द्यायचा, त्यांना उलट दिशेने जाऊ द्यायचे नाही. आपल्या हदयातील रक्त वरच्या कप्प्यांतून खालच्या कप्प्यांत जाते तिथे असाच व्हॉल्व असतो. शिवाय तुम्ही ऑस्मोसिसच्या (osmosis) धडयापर्यंत पोचला असाल, तर तेही अस...

मना अजाणा...... (मराठी कथा)

मना अजाणा.. लीना मेहेंदळे आज तू या रोपाच्या समोर कुंडीच्या काठावर डोक टेकून बसला आहेत. आठवतय्‌ ते आधी कुठे होत ? खूप दूर कुठेतरी. खर तर ते रोप पण नव्हत- निव्वळ एक बीज. छे, ते ही नाही ! काहीच नाही ! फक्त एक अनुभूति ! एक अनामिक अस्तित्व बोध - आहे, कुठे तरी | मग हळूच ते तुझ्यापर्यंत कस आल ? अमूर्त होत ते मूर्त होवून | अनामिक होत ते नामधारी बनून ? का तू त्याला साद घातलीस ? कां त्याला गोंजारलेस ? कां त्याला कवेत घेऊन त्याच्या सांवळया, कोमल पानांवर आपले ओठ टेकलेस ? कुठून तरी तू कुंडी आणलीस, कुठून तरी माती आणि कुठून तरी पाणी | आणि रोपाला अलगद रुजायला एक जागा मिळवून दिलीस. राहील इथेच, आपल्या बाल्कनीत - तू मनोरमाला म्हटलेस. आणि त्याला रोज रोज पाणी कोण घालणार ? मला नाही जमायच ते. मनोरमा म्हणाली, काळजी नको करुस. मी टाकत जाईन. मधे खूप दिवस गेले. विदेशातून आल्यापासून तू आपल्या नोकरीत बुडून गेला होतास. रोज उशीरा उठायच. धावत पळत ऑफिस गाठायच. परत येतांना कधी मुलांना आणायच तर कधी भाजी बाजार करायचा. कधी स्कूटर सर्व्हिसिंग, कधी शेअर्सच्या मागे धावाधाव. खूपदा मित्रांबरोबर बियर पिणं. रोज उ...